Posts

Showing posts from August, 2018

नव्याने जगण्यासाठी उमेद 1

त्या दिवशी तो एकटा नव्हता. भेटायचं ठरलं होतं तर एकट यावं लागेल अशी अट घालणे ही त्याची जिद्द.मग मी ही माझा ईगो घेवून चालणार! मी तरी का एकट यावं मग .तु चुकलं की चुक दाखवून देत होतास ना मग तु केलेली चुक मुळात चुकच नसते . अस मी का ग्राह्य धरायचं. कुठेतरी कधी तरी असा वागशील हे मी बाधित धरलं नव्हतं. असो पण आता मात्र या सगळ्यांच्या तुलनेत मी एक्झिस्टच नाही करत ,याचा मला अभिमान आहे. तस म्हणण्यापेक्षा मी माझ्या स्वाभिमानाला नव्याने  भेट दिली अस ग्रहित धरायला हरकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संधी शोधून मला पर्सनलि शब्दांची जी काही भेट तु दिली होती ती मी आनखीण सहन करू शकत नाही आणि मला आवडनारही नव्हत.लपून छपून बोलनं, काहीतरी नवीन काही तरी वेगळं घेवून येणं,न सांगता खर्च करणं, लेट नाईट बाहेर राहन या सगळ्यांच्या मला राग नव्हता पण चिड चिड होत होती.तु स्वतःला  माझ्या प्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करत होता आणि मला तु जसा आहेस तसाच हवा होतास.कसं समजत नाही तुला आयुष्यातले सगळे  गणित सहज सुटत नसतात.काही गणित सोडवावी तितकीच किचकट होत जातात. गुदमरून जगणं याला आयुष्य म्हनत नाहीत.आणि हे कळायला तुला खुपच उशी

नव्याने जगण्यासाठी उमेद 2

                 आयुष्यात संधी उपलब्ध करून देणारे क्षण भरपुर असतात पण त्या मिळालेल्या संधीचे सोने करणे हे खरंतर स्वताःच्या अस्तित्वाला एक चॅलेंज असतं. आणि मी स्वतंत्रपणे जगणारी मद-मस्त आयुष्याची डोर ओढणारी स्वच्छंदी नार झाले होते. खरंतर तुझ्यासोबत राहून स्वतःसाठी स्वार्थ कसा निवडायचा हे खुप छान शिकले होते. नशेत बेभान होऊन जसा तु वेडावाकडा बागडायचासना तेव्हा तुझ्या वागण्याचा त्रास मी स्वतः करुण घेतला  .पण बंधन बाधलेलं होतं ना तेव्हा .तुझ्या वागण्याचा त्रास मनामध्ये विस्तवातुन काढलेल्या सळीसारखा बोचत असायचा. कै एकवेळा मन मोकळं करायचा प्रयत्न केला पण!.हा पण नेमकं आडवा यायचा. कदाचित तु बांधिल ठेवलं होतस म्हणून.          ' ऋणानुबंध जोडले गेलेच नाही. म्हणून तु तुझा राहीला आणि मी माझीही होवु शकले नाही'.                  आज अचानक भुतकाळ असा समोर येवून वर्तमानकाची चापट देवून जाईल ही कल्पना मात्र ही मी करू शकले नव्हते. हा कॉफीचा एक कप माझं विसरलं गेलेलं भुतकाळ तो एखाद्या वादळाप्रमाने आला आणि आवर्जून आठवणींचा पसारा मांडून बसला. त्यावेळी तु केलेला पसारा मला एकटीला आवरावा लागत होता. आत्ता

दोष

           दोष नेमका कोणाचा......?.                डाग दिसतात चेहऱ्यावरचे म्हणून तीनं स्कार्फ गुंडाळला आणि दळण दळणयासाठी गिरणीच्या दिशेने वाट निवडली. घराला लाँक लावला आणि दळणाचा डबा कमरेवर ठेवणार तोच शेजारच्या काकूंनी आवाज दिला... '"अग अश्विनी किती सहन करनार आहेस अजून ,जा आईच्या घरी निदान दोन वेळेच जेवण तरी मिळेल तिथे,इथं या नराधमाच्या तावडीतून सुटशील तरी एकदाची.'" पण ती चेहर्यावरचा स्कार्फ सांभाळत डबा उचलून निघाली . घरापासून काही अंतरावर गिरणी होती.तीला पाहून गिरणीवाला पण थबकला. गेल्या ६ महिन्यात त्यालाही सवयच झाली होती हिला या अवस्थेत पहायची. लई थाटामाटात लग्न करून आणलं होत अनिलनं तिला. आख्खिचाळ गेलती लग्नाला.             स्वर्गातून जोडा जमिनीवर उतरला होता जजणू. काय सुंदर दिसत होती आश्विनी आप्सरा पण कमी सुंदर दिसते .पहिल्या दोन महिन्यात काही कमी नव्हती गोडी संसारात पण जेव्हा पासून नवीन घरात प्रवेश केला तेव्हा पासून ती अप्सरा मोलकरीण दिसून येते. गिरणीच्या मागे भाड्याने राहत होता अनिल आणि त्याची बहिण तनुजा . अश्विनीलाही तनुजानेच पसंत केले होते. अनिलच लग्न लावून तनुज