रंग बेरंगी चितेचा
......... रंग बेरंगी चितेचा... खरच आकाश निळ्या शाई ने भिजलेला असतो जेव्हा तो उन्हाच्या झळ्याने बदडलेला असतो ..कधी कधी ते ढगं जळुन काळी ही होतात बरंका.. आणि काळी झाली म्हणुन ती रडताही... कधी थोडी तर कधी वेगाने.. कधी कोणाच्या दुःखात रडतात तर कधी कोणाच्या सुखात रडतात.. कधी दुस-यांना रडवतात तर कधी कोणाचे रडु् लपवतातही....ढगं रडली ना की मग बागेत व इतरत्र रंगबिरंगी फुलं उमलतात मग चहुकडे हिरवळ दाटु लागते... वसंत पंचमी बहरते... फुलांवर ना ना प्रकारचे फुलपाखरु डोलु लागतात... नवी- पालवी फुटलेलं हिरवं झाडही मग वा-याच्या लहरीत नाचु लागतात... रम्य परीसराने बहलेलं हे वातावरण नव-नव्या प्रेमाची गाणीं म्हणतात ....दरी -खो-यातुन शुभ्र पांढ-या रंगाचे पाणी वेगात वाहु लागतात... झ-यातुन वाहताना त्या पाण्याला ही खळ-खळुन गीत म्हणावसं वाटतं आणि तो त्या गीताच्या तालावर नाचतो सुद्धा... मग आकाशातुन रडनारे ढगं जमीनीला भेटन्यासाठी आतुर होतात मग त्यातले काही अश्रु हवेत तरंगतात आणि त्या इंद्रधनुष्याच्या स्वाधीन होतात... मग सात रंगांचे लहर तयार होते तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,न